भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आगामी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुतीच्या पाठीशी उभे रहा, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी, आशिर्वादरूपी मतदान करून लखपती दिदी करण्यासाठी, प्रत्येकाला घरकुल मिळण्यासाठी, आतंकवादाचा खातमा कराण्यासाठी, भाजपा महायुतीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे विकास संवाद सभेला संबोधीत करतांना ते बोलत होते.
यावेळी अकोला विमानतळासाठी भरघोस निधी देऊ तसेच शेतक-यांना २४ तास विज पुरवठा मोफत देण्यासाठी सरकार कटिबध्द असून अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी पाठपुरावा कशा पध्दतीने करावे, हे आ. रणधीर सावरकर यांच्या पासून शिकण्यासारखे आहे. अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी व लोकसभा मतदार संघातील जनतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. भर पावसात शेतकरी आणि नागरीकांची उपस्थीती प्रेदणादायी असल्याचे सांगून त्यांनी राज्य शासन आदिवासी समाजासाठी आयोगाची स्थापना करीत आहे. तसेच समाजातील सर्व घटकांचा व शेतकरी सुखी समृध्द व्हावा यासाठी सरकार कार्यरत आहे. असेही ना. फडणवीस म्हणाले अकोला शहरातील भुमीगत गटार योजनेकरीता लागणारी ३० टक्के रक्क्म शासन भरेल अशी घोषणा केली.
यावेळी मंचावर भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री ना. आकाश फुंडकर भाजपा सरचिटणीस आ. रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे उपेंद्र कोठेकर आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, अनंतराव देशमुख, संतोष शिवरकर, जयंत मसने, जयंत डेहणकर, सुधीर सर्यवंशी, किशोर पाटील मांगटे, अर्चना मसने, विजय अग्रवाल, माधव मानकर, दशरथ भांडे, विजयराव जाधव, नकुल देशमुख, वसंतराव खोटरे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, कृष्णा शर्मा, वसंत बाछुका, संजय गोटफोडे, देवाशीष काकड, रमेश अलकरी, सागर शेगोकार, डॉ. संजय शर्मा, सिध्दार्थ शर्मा, संजय जोशी, अक्षय जोशी, पवन महल्ले आदि मंचावर विराजमान होते.
यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये माजी आमदार किसनराव राऊत यांचे नातू अजिंक्य राऊत, विजय सिरसाट यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला तर बुलढाणा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी माजी जि.प. सदस्य सुरेश वनारे, सुरेशसिंह तोमर, प्रकाश नरवाडे, मधुकर तोमर, भरतसिंग चव्हाण, मंगला घोपे, उत्तम घोपे, आशिष चव्हाण, नागेश बारोडे यांनी प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्राच्या विकासासाठी व १४ कोटी जनतेच्या कल्याणासाठी सर्वस्पर्शी विकासासाठी ना. देवेंद्र फडणवीस यांच सक्षम नेतृत्व लाभले असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला विजयी करण्याचे आवाहन प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी केले. यावेळी बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे समोचीत भाषण झालेत. स्वागतपर भाषण जिल्ह्याचे पालकमंत्री ना. आकाश फुंडकर यांचे भाषणे झालीत तर खा. अनुप धोत्रे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून जिल्ह्याच्या अनेक समस्या मुख्यमंत्री यांचेकडे मांडल्या. तर प्रास्ताविकमध्ये आ. रणधीर सावरकर यांनी राजराजेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा व ५० कोटी रूपये तसेच न्यु तापडीया नगर उड्डान पुलासाठी वाढीव रक्कम तसेच पशुसंवर्धन कार्यालय अकोला येथे आणण्याची मागणी तसेच अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करणे विमानतळ औद्योगीक वसाहती करीता २०० हेक्क्टरचे भुसंपादन अकोला महानगरातील महाबीज कर्मचारी यांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. आ. सावरकरांच्या मागणी दखल घेऊन ६०१.८० कोटी रूपये उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
कार्यक्रमात अकोला भाजपा तर्फे मुख्यमंत्र्यांना अकोला जिल्ह्याची ओळख असलेली शेतकरी बैलबंडी पांढ-या सोन्याची प्रतिकात्मक प्रतिकृती सप्रेम भेट देण्यात आली. तसेच ना. शिवेंद्रराजे भोसले यांना भक्ती आणी शक्ती यांचे प्रतिक तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचलन सिध्दार्थ शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय अग्रवाल यांनी केले.
क्षणचित्रे
आदिवासी व वंजारा समाजातील महिला परंपरागत वेशभुषेमध्ये वाजत गाजत आले होते. शहरातून अनेक ठिकाणाहून मोटर सायकल रॅली सभास्थळी आली.
आ. रणधीर सावरकर यांचे नेतृत्वात सतत १० दिवस जय्यत तयारी मध्ये २००० पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते.
डॉ. प्रविण अग्रवाल यांचे नेतृत्वाखाली आरोग्यसेवा पुरविण्यात आली. जेष्ठ कार्यकर्ते पवन पाडीया लहाने परिवार वाजत गाजत सहभागी झाले. इलेक्ट्रीशीयन वर्कर संघटना हे सुध्दा वाजत गाजत कार्यक्रम स्थळी आले उमरी भागातील वेगवेगळ्या भगीनी मंडळे वाजत गाजत आले होते. पाऊस सुरू असतांना सुध्दा आपले लाडके नेते देवाभाऊ आणी रणधीरभाऊ यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. मृगाचा पाऊसाची प्रतिक्षा शेतकरी पाहत होते आणी ना. देवेंद्रजींच्या आगमण प्रसंगी पावसाने हजेरी लावून शेतक-यांना सुखावले.
भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता दिलेल्या जबाबदारी नुसार काम करत होता व सौ. सुहासिनीताई धोत्रे सौ. मंजुषाताई सावरकर कार्यकर्त्यांमध्ये बसून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवित होते. समाजातील सर्व घटक जात पात पंथ विसरून सभेत रेकॉर्डब्रेक गर्दी केली. जवळपास २२ किलोमिटर शहर ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने गजबजले होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक भागात पवन महल्ले कुणाल शिंदे यांच्या चमुने केली व भाजपा युवा मोर्चा यांनी केली. जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आ. रणधीर सावरकर पालकमंत्री आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे आ. प्रकाश भारसाकळे आ. हरिष पिंपळे आ. वसंत खंडेलवाल संतोष शिवरकर जयंत मसने विजय अग्रवाल यांच्या सामुहिक नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात अकोल्याच्या इतिहासात सभेत उपस्थीती होती.
आ. रणधीर सावरकर स्वतः संपुर्ण सभा स्थळी जाऊन कार्यकर्त्यांना व जनतेला अभिवादन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा