India-Pakistan-Ceasefire: युद्धजन्य परिस्थिती विरामावर एकमत, मात्र दहशतवाद विरोधात तडजोड नाही - एस. जयशंकर यांचं वक्तव्य



भारतीय अलंकार न्यूज 24

भारत आणि पाकिस्तानात युद्ध  विरामासंदर्भात एकमत झालं आहे. मात्र भारत दहशतवाद विरोधात कुठलीही तडजोड करणार नाही, असं वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी दोन्ही देशांमध्ये युद्ध जन्य परिस्थिति विराम संदर्भात एकमत झाल्याची माहिती दिली आहे.



X वर पोस्ट करत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले आहेत की, दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली आहे. भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबविण्यास सहमती दर्शविली आहे. हिंदुस्थान दहशतवादाविरोधात कुठलीही तडजोड करणार नाही, असंही ते म्हणाले.



दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी X वर पोस्ट केले आहे की, पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले असल्याचा त्यांनी दावा केला. 



टिप्पण्या