vba-manifesto-publish-akola: सत्तेत आलो तर केजी ते पीजी पर्यंत सर्वांना शिक्षण मोफत- वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा तयार





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : वंचित बहुजन आघाडीने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून भाजपच्या जाहीरनाम्याला विरोध केला आहे. वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात आज हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.





यावेळी वंचितने NRC आणि CAA ला आपला विरोध दर्शविला आहे. CAA चा सर्वाधिक फटका VJNT  बसणार असल्याचं आंबेडकर म्हणाले.



CAA च्या माध्यमातून भाजप हिंदू मतदारांना फसवत असल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केला.



वंचित बहुजन आघाडीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना हमी भाव कायदा केला जाईल, असं देखील आंबेडकर म्हणाले.



आजच्या जाहीरनाम्यात शिक्षण , शेतकरी, उद्योग,आरोग्य, महिलांसाठी योजना आणि ग्रामीण विकासावर भर देण्यात आला. समान नागरी कायद्याचा धोका RSS ला असल्याचं आंबेडकरांनी सांगितले.


तुषार गांधी यांच्या आरोपावर बोलतांना आंबेडकर म्हणाले की, महात्मा गांधी यांना वंचितांनी उभे केल, त्याच प्रमाणे वंचित लोकसभेच्या माध्यमातून वंचितांना उभ करण्याचं प्रयत्न असून तुषार गांधी यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे होती, अशी अपेक्षा आंबेडकरांनी व्यक्त केली.



वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे



* सत्तेत आलो तर केजी ते पीजी पर्यंत सर्वांना शिक्षण मोफत.


* विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाचा अनुशेष भरून काढला जाईल.


* सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पाचे खाजगीकरण रद्द करण्यात येईल.


* शेतकऱ्यांचा मालाला हमीभाव दिला जाईल.


*ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी कृषी प्रक्रिया उद्योग कृषी पूरक व्यवसाय , कलाकुसर कौशल्य विकासास प्राधान्य देण्यात येईल.




* NRC आणि CAA कायदा रद्द करण्यात येईल.



* महिलांचे पशुधनावरील अधिकारात मान्य करून योजनांमध्ये महिलांना प्राधान्य देऊ.


* प्रत्येकाला सरकारी आरोग्य सेवेत विनामूल्य दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात येईल.


* आदिवासी गावांमध्ये वनोजावर आधारित स्वयंरोजगार प्रशिक्षण राबविणार.


* 2018 च्या तृतीयपंथी विधेयकाला विरोध.




वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित 




ॲड. प्रकाश आंबेडकर : आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. 


वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे आता NRC आणि CAA यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ते पूर्णपणे असंविधानिक आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे असे दाखवले जात आहे. पण त्याचा सर्वांत मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळात ज्यांना पेंढारी म्हटले जात होते आणि आता ज्याला VJNT आपण म्हणतो. त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे. भारतीय जनता पक्ष इथल्या हिंदू मतदारांना फसवत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे. NRC आणि CAA मुस्लिमांच्या विरोधात आहे. पण प्रत्यक्षात ते 20 टक्के हिंदू समाजाच्या विरोधात असल्याचेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.



कंत्राटी कामगाराला 58 वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचे कोणी उल्लंघन करेल त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षा देखील असेल असेही जाहिरनाम्यात नमूद करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.


शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातो आणि तो अर्थव्यवस्थेवर बोजा आहे असे आम्ही मानतो. शिक्षण हे खासगी करून शिक्षण महर्षींनी कैदी केले आहे. या शिक्षण धोरणाला कैदेतून मुक्तता देत शिक्षणाबाबत सरकार आणि सार्वजनिक संस्था संमिश्र भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


केंद्रात शिक्षणावर फक्त 3 टक्के तरतूद आहे, राज्यात 5 टक्के तरतूद आहे. शिक्षण ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. म्हणून त्याला 9 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.


ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्र हे देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रिया चालली आहे, तिला आम्ही थांबवणार आहोत. नवीन औद्योगिक धोरण राबवणार आहोत,  ज्यामुळे शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. आम्ही सत्तेत आल्यावर कापसाचा प्रती क्विंटल भाव किमान 9 हजार आणि सोयाबीनला 5 ते 6 हजार भाव दिला जाईल. शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा या दृष्टीने आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे. 


ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण असले पाहिजे, ही मागणी देखील आम्ही करत आहोत. आम्ही सरकारमध्ये आल्यावर एस. सी, एस. टी यांना जे आरक्षण मिळत आहे त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका घेणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.


आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती आम्ही जाहीर करणार आहे, त्यावरून आपल्याला कळेल की त्या उमेदवाराचा समाज आम्ही का अधोरेखित केला आहे हे आम्ही सांगणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.


पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिलिंद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, पराग गवई आदी उपस्थित होते.



समान नागरी कायदा हा संविधानाला धोका नाही, आरएसएसला धोका आहे


समान नागरी कायदा हा संविधानाला धोका नाही पण हा आरएसएसला धोका आहे. तसेच हा  तोटा आमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांचा तोटा नाही, तर हा तोटा धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या पक्षांना आहे. विशेषतः भाजप, आरएसएस आणि बजरंग दल यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होणार असल्याचा टोला त्यांनी आरएसएसला लगावला आहे.



तुषार गांधींनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता 


महात्मा गांधींना वंचितांनी सवर्ण नेतृत्वाच्या विरोधात उभे केले. तुषार गांधी यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आम्ही इथल्या वंचितांना उभे करत आहोत. इथल्या सवर्ण नेतृत्वाच्या विरोधात उभे करत आहोत, त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. असे मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.



प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष जितरत्न पटाईत, मिडिया प्रमुख ॲड. नरेंद्र बेलसरे, विकास सदांशिव, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, पराग गवई, सचिन शिराळे आदी उपस्थित होते.


टिप्पण्या