lok-sabha-election-2024-MH: प्रकाश आंबेडकर यांचे मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र; काँग्रेसला 7 जागांसाठी पाठिंबा





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आगामी लोकसभा निवडणुक तोंडावर आली आहे. निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे. मात्र महाविकास आघाडीत अद्याप ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला नाही.

असे असून सुध्दा राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली होती. आंबेडकर यांच्या या सभेत उपस्थितीनंतर वंचितचा मविआत समावेश होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आज प्रकाश आंबेडकरांनी एक पत्र लिहून राजकिय वर्तुळात खळबळ उडवून टाकली आहे. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचे आता ठरवले असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. 





काय आहे पत्रात?

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आज पत्र लिहले आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी लिहले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र वंचित आघाडीला जागा वाटपाच्या बैठकीचे निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींना ऐकून घेत नाहीत. यामुळे या दोन्ही पक्षांवरचा आमचा विश्वास उडाला आहे. आम्हाला सापत्न दुष्टीकोण देण्यात येत असल्याचाही आरोप आंबेडकरांनी यावेळी केला.


हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचे आता ठरवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 7 मतदार संघाची माहिती द्यावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगे यांना केली आहे. काँग्रेसच्या पसंतीच्या 7 जागांवर वंचित काँग्रेस उमदेवारांना पुर्ण पाठिंबा देईल. वंचितने काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे, असे प्रकाश आंबडेकरांनी पत्रात म्हटले आहे.



असे आहे पत्र


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत भेट झाली, याचा आनंद आहे. आम्हाला फार काळ चर्चा करता आली नाही म्हणून पत्र लिहत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आणि वंचित आघाडीला जागा वाटपाच्या बैठकीचे निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अनेक बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना ऐकून घेत नाही आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांवरचा आमचा विश्वास उडाला आहे. आम्हाला सापत्न दुष्टीकोण देण्यात येत आहे.

वंचितचा प्राईम अजेंडा भाजप-आरएसएसला हटवा हाच आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातील 7 जागांवर वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 7 मतदार संघाची माहिती द्यावी, काँग्रेसच्या पसंतीच्या 7 जागांवर वंचित काँग्रेस उमदेवारांना पुर्ण पाठिंबा देईल. वंचितने काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे. 

टिप्पण्या