Amravati crime: भाईगिरीच्या वर्चस्वावरून वाद : भर रस्त्यात धारधार शस्त्राने युवकाची हत्या!

 




अमरावती:बडनेरा येथील बसस्थानकासमोर  भर रस्त्यात ३२ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना २६ जुलै रोजी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास घडली.  मारेकऱ्यानी घटनास्थळावरून पळ काढला असून,  बडनेरा पोलीस मारेकरांच्या मागावर आहेत.


प्राप्त माहितीनुसार अमरावती जिल्हयातील बडनेरा येथील मिल चाळीत राहणारा अंकुश सागर मेश्राम (वय वर्षे ३२) याच्या सोबत काही युवकांनी भाईगिरीच्या वर्चस्वावरून वाद केला.  या वादावरून त्या युवकांनी अंकुश यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना घडली. नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेले बडनेरा बस स्थानकासमोर भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  घटनास्थळी  बघेकऱ्यांची गर्दी जमली होती.


घटनास्थळी पोलीस दाखल होताच घटनेचा पंचनामा करून मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपीची नावे अद्याप समोर आले नाहीत. पुढील तपास बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

टिप्पण्या