winter-session-shivani-airport: अकोला विमानतळ धावपट्टीचे विस्तारीकरण करून विमानतळ सुरू करावे; आमदार अमोल मिटकरी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी




मुंबई/अकोला: अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा व अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या अकोला शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण अत्यंत महत्वाचे असून अकोला विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेत केली . आमदार अमोल मिटकरी यांनी हिवाळी अधिवेशनात विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मांडला. या वेळी राज्य शासनाच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी समाधान कारक उत्तर देत सदर विमानतळ हे भारतीय विमानपतन प्राधिकरण अखत्यारीत असून याबाबत महाराष्ट्र विमानपतन प्राधिकरणाकडे माहिती मागवली असून याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक असून विमानतळ लवकर पूर्ण व्हावे धावपट्टीचे विस्तारीकरण व्हावे, या उद्देशाने राज्य सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादन अधिवेशनामध्ये केले. 


अकोला विमानतळ हे अनेक वर्षांपासून निर्माण झालेली असून व्यापार उद्योगाच्या व शिक्षणाच्या दृष्टीने विमानतळाच्या धावपट्टीची विस्तारीकरण होणे फार महत्त्वाचे असून धावपट्टी चे विस्तारीकरण झाल्यास 80 आसनी विमानसेवा सुरू करण्यास मदत होऊ शकते सध्याच्या RCS धोरणांतर्गत प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो 80 पेक्षा कमी शीट असणाऱ्या वर्गात एअरक्राफ्ट्स, ATR-42 आणि ATR-72 प्रकारची विमाने भारतीय शेड्यूल्ड एअरलाइन्सकडे उपलब्ध आहेत त्याचा उपयोग अकोला विमानतळासाठी केला जाऊ शकतो.


अकोला रेल्वे स्थानक, जे एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे, जे मुंबई व हैदराबाद पासून 580km अंतरावर आहे त्यामुळे अकोला - नागपूर, मुंबई आणि हैदराबाद येथून हवाई मार्ग चांगल्या प्रमाणे प्रवासी वाहतूक करू शकतो. अकोला जिल्ह्याच्या जवळच शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे अकोला विमानतळ फार महत्त्वाचे ठरते. 

अकोल्यापासून फक्त 50km अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार आहे. 




अकोला शहर पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र म्हणून काम करत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी आणि कायदा, हवाई संपर्कामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल. महाबीजसह अनेक सरकारी संस्था तसेच कृषी विद्यापीठ यांचा समावेश आहे. त्यामुळे अकोला विमानतळावरून लवकरात लवकर विमान सेवा सुरू झाल्यास या सुविधेमुळे पर्यटनाला चालना मिळेल औद्योगिक विकास होईल असे प्रतिपादन यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केले.



विमानतळासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा हस्तांतरण प्रस्तावाची सद्यस्थिती काय आहे व हस्तांतरण करण्यास विलंब का लागत आहे व भारतीय विमान पतन प्राधिकरण यांच्याकडून फॅसिबीलिटीज रिपोर्ट येण्यास विलंब होत आहे त्याबाबत राज्य सरकार काही कारवाई करणार आहे का तसेच हे विमानतळ सुरू होण्याबाबत निश्चित कालावधी काय असणार आहे याबाबतचा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी हिवाळी अधिवेशनात मांडले.

टिप्पण्या