Azadi ka Amrit Mahotsav: Run for India: गेटवे ऑफ इंडिया येथून फीट इंडिया फ्रीडम रनचा महाराष्ट्रात शुभारंभ; अकोल्यातही झाली स्वातंत्र्य दौड

                

                 क्रीडांगण

         नीलिमा शिंगणे-जगड


Launch of Fit India Freedom Run in Maharashtra from Gateway of India;  Akolekar also participated in the freedom race


                  ठळक मुद्दे


एनएसजी कमांडोंच्या नेतृत्वात गेटवे ऑफ इंडिया इथे फिट इंडिया फ्रीडम रन


दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायामासाठी खर्च करा- केंद्रीय क्रीडा मंत्री


नेहरू युवा केंद्रातर्फ ऑगस्ट क्रांती मैदान आणि इतर ऐतिहासिक महत्वाच्या स्थळांवरून फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन



 


फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दल- एनएसजच्या 50 कमांडोनी नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडीयम इथे झालेल्या अखिल भारतीय दौड मध्ये सहभाग घेतला. त्यांच्यासह, देशातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या 10 स्थळांवरून निमलष्करी दलाचे जवान आणि सर्वसामान्य नागरिकही या उपक्रमात सहभागी झाले होते. यात, अलाहाबाद येथील आझाद पार्कपासून सीआरपीएफचे जवान, पोर्ट ब्लेअर इथल्या सेल्युलर जेलपासून सीआयएसएफचे जवान, हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पिती इथून आयटीबीपी चे जवान, आसामच्या तेजपूर इथून, सीमा सुरक्षा दलाचे जवान, भारत-पाक सीमा, अटारी इथून सीमा सुरक्षा दलाचे जवान, झांसी रेल्वे स्थानकापासून, पंजाब रेल्वेचे जवान या सगळ्यांनी या देशव्यापी स्वातंत्र्य दौडमध्ये सहभागे घेतला होता. तर नेहरू युवा केंद्र संघटनेने लेह आणि चेन्नई इथून या उपक्रमात सहभाग घेतला होता.


या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे आणि त्याला लोक चळवळीचे – ‘जन भागीदारी से जन आंदोलन’ असे स्वरूप देण्याचे आवाहन केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. नागरिकांनी दररोज किमान अर्धा तास शारीरिक व्यायाम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे- ‘फिटनेस की डोस, आधा घंटा रोज’.




गेटवे ऑफ इंडिया- फ्रीडम रन


मुंबईतील गेट वे इंडिया या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील ऐतिहासिक स्मृतीस्थळापासून, ही फ्रीडम रन सुरु झाली, याच ठिकाणाहून, भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 साली ब्रिटीशांची शेवटची तुकडी, भारतातून इंग्लंडला रवाना झाली होती. 






देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दल- एनएसजी च्या 50 कमांडोंनी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथून फ्रीडम रनची सुरुवात केली. या जवानांनी, मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या इमारती, जसे मुंबई उच्च न्यायालाय, नरीमन पोइंट इथून ही दौड घेत, गेटवे ऑफ इंडिया येथेच त्याची सांगता केली.


यावेळी बोलतांना एनएसजी चे ग्रुप कमांडर, कर्नल नितेश कुमार म्हणाले, “या दौड मध्ये सहभागी झालेल्या सर्व जवानांनी कोविड विषयक नियम-प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले”. 


फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमाचा देशव्यापी शुभारंभ करताना, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी, सध्याच्या विपरीत हवामानाच्या स्थितीतही यशस्वीपणे दौड केल्याबद्द्द्ल एनएसजीचे ग्रुप कमांडर कर्नल नितेश कुमार, आणि त्यांच्या 50 जवानांच्या चमूचे कौतुक केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमांचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.


 


ऑगस्ट क्रांती मैदानापासून फ्रीडम रन



नेहरू युवा केंद्र संघटनेने ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानापासून, सुरु केलेल्या फ्रीडम रन मध्ये 20 स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्याआधी, सर्वांनी ऑगस्ट क्रांती स्तंभ इथे फिटनेस म्हणजेच तंदुरुस्त आरोग्य राखण्याची प्रतिज्ञा घेतली. आधी गोवालिया टॅंक मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावरच महात्मा गांधी यांनी 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा नारा दिला होता.




पुण्यातील फ्रीडम रन



पुण्यातील नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयाने, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेपासून, या फ्रीडम रनची सुरुवात केली होती. त्यावेळी ‘पुना’अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराने स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले होते. तसेच, याच शहरात, हुतात्मा क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म झाला होता; ज्यांना भगत सिंह, सुखदेव थापर यांच्यासह ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हत्येसाठी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या सर्वेंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सचिव, मिलिंद देशमुख या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.




नेहरू युवा केंद्राने देखील महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या रायगड इथून फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील गावागावात स्वराज्याची ज्योत पेटवणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मस्थानापासून ही दौड सुरु झाली. तसेच, वर्धा, अकोला, हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणीही स्वातंत्र्य दौड आयोजित करण्यात आल्या होत्या.



अकोला येथे फ्रीडम रन



या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत. भारत सरकार द्वारा भारतातील सर्व जिल्हा मध्ये आझादी का अमृत महोत्सव – इंडिया @75 अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम दौडचे आयोजन १३ ऑगस्ट ते ०२ ऑक्टोंबर कालावधीत करण्यात येत आहे.  या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा विषयी माहिती पोहोचविणे, युवकांमध्ये फिटनेस संबंधी जागरूकता निर्माण करून त्यांना दररोज व्यायामाची आवड निर्माण करणे, हा आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा स्तरीय स्थळ व दिनांक भारत सरकार द्वारा निश्चित करण्यात आले होते.


अकोला जिल्ह्यातील सीताबाई कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची यासाठी  निवड करण्यात आली होती. आज १३ ऑगस्ट रोजी सीताबाई महाविद्यालयात “आझादी का अमृत महोत्सव – इंडिया @75 अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम दौड” चे आयोजन केले  होते. प्राचार्य डॉ. राधेश्याम सिकची यांच्या शुभ हस्ते ध्वज आरोहण करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपचंद अग्रवाल विराजमान होते. प्रमुख मार्गदर्शक जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव ,  प्राचार्य डॉ. राधेश्याम सिकची, एन.सी.सी. कमांडिंग ऑफिसर संजय पांडे उपस्थित होते.



महेश शेखावत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक  उदय देशमुख यांनी कार्यक्रम आयोजना ची विस्तृत माहिती दिली. तसेच अश्या प्रकारचा कार्यक्रम अकोला जिल्ह्यातील 75 गावामध्ये लोक सहभागातून , जिल्हा प्रशासन , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, एन.एस.एस. , एन.सी.सी. स्थानिक पदाधिकारी स्थानिक प्रशासन, स्थानिक विद्यालय महाविद्यालय , युवक मंडळांच्या सहकार्याने कॉविड-19  चे निर्देश पाळून आयोजित करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, एन.सी.सी. कमांडिंग ऑफिसर संजय पांडे यांनी उपस्थित युवकांना फिट राहण्यासाठी दररोज रनिंग व नियमित व्यायाम करावा असे सुचविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रूपचंद अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधना मध्ये स्वातंत्र्य वीराविषयी, त्यांच्या बलिदान, त्यागा विषयी माहिती दिली.  वर्तमान काळात युवकांनी विधायक कार्या कडे वळून आपले समाजाचे व पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. राधेश्याम सिकची यांनी फिट इंडिया फ्रीडम दौड ची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली.  उदय देशमुख यांनी आभार मानले. यानंतर रूपचंद अग्रवाल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दौडला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. दौड सीताबाई महाविद्यालय येथून निघून सिव्हील लाइन्स चौक  दुर्गा चौक  अग्रेसन चौक अशी मार्गक्रमण करीत वसंत देसाई स्टेडीयम येथे पोहचली.


         


देशातील 744 जिल्ह्यात फ्रीडम रन



आझादी का अमृत महोत्सवांतर्गत युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या या संकल्पनेअंतर्गत साकारण्यात आलेलता फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 देशात 75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. दीड महिन्यात एकूण 744 जिल्ह्यात हे कार्यक्रम होतील.


लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ यासारख्या तंदरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, तसेच लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव, चिंता, आजार यापासून त्यांना दूर राखणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.


नामवंत लोक, लोकप्रतिनिधी, पंचायत नेते, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, प्रसारमाध्यम क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर, शेतकरी आणि लष्कराच्या जवानांनी विविध स्तरांवर या कार्यक्रमांना उपस्थित राहून लोकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात येत आहे


लोकांनी त्यांच्या रनचे फोटो फिट इंडिया पोर्टलवर https://fitindia.gov.in  अपलोड करावेत, आणि त्यांच्या सोशल मिडीयावरूनही #Run4India  आणि #AzadikaAmritMahotsav  हे हॅशटॅग वापरून फ्रीडम रनला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या