Lockdown in Maharashtra: मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले कडक लॉकडाउनचे संकेत; परिस्थितीचा आढावा घेवून राज्यात येत्या दोन दिवसात लॉकडाऊन!




भारतीय अलंकार 24 

मुंबई: राज्यात आज ४७ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले. दररोज साधारण ४५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात सरकार लॉकडाऊन लावेल की नाही, अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी त्यांनी समाज माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेवून येत्या दोन दिवसात lockdown करण्याचे स्पष्ट संकेत दिले.



यावेळी त्यांनी राज्यात उपलब्ध असणाऱ्या आरोग्य यंत्रणेची माहिती जनतेला दिली. तसंच रुग्णवाढीचा वेग असाच राहिला तर आरोग्य यंत्रणांना मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येत्या दोन दिवसात राज्यात काही तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.




आपल्याला जनतेचा जीव वाचवायचा आहे. मी आज सुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतो. मी दोन दिवस परिस्थिती बघेन. सर्व अधिकाऱ्यांकडून आढावा घेईन. राज्यात बदल दिसला नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्याबाबतचा इशारा देतो. त्यामुळे आतापासून आपण ठरवूया. आपण ही लाट रोखूच. याशिवाय यापुढची लाटही रोखू या, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी कडक लॉकडाऊनचे संकेत जनतेशी संवाद साधताना दिले आहेत. 



संवादातील ठळक मुद्दे




कोरोनाचा शिरकाव होऊन आता वर्ष पूर्ण झालं आहे. मधल्या काळात या विषाणूला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो.


कोरानामुळे जगाची आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली आहे.


लॉकडाऊन करण्याची शक्यता पूर्णपणे टळलेले नाही.


लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोना वाढला.


अडीच लाख चाचण्या राज्यात रोज करणार, केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार चाचण्या होणार. 70 टक्के आरटीपीसीआर  चाचण्या करणार.


लॉकडाऊन होणार का? याचं उत्तर मी आता देत नाही.


पाचशे चाचण्यांची सेंटर उभारली आहेत, 50 हजार चाचण्या दर दिवसाला करत आहे.


महाराष्ट्रात 75 हजार चाचण्या करण्याची क्षमता 1 लाख 82 हजार एवढी झाली आहे. पण त्याहीपेक्षा अडीच लाख क्षमता करायची आहे.


काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही, सत्य काय आहे ते जनतेसमोर ठेवत आहे.


मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे मला विलन जरी ठरवलं तरी मला चालेल. गेल्या वर्षी परिस्थिती गंभीर होती बेड्स अंबुलन्स मिळत नव्हती.


लस घेतल्यावर काही जण कोरोना बाधित होत आहेत. लस घेतल्यावर काळजी घेणं गरजेचं आहे. 




रुग्ण वाढ झपाट्याने होतं आहे. एकट्या मुंबईत 8 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहे.


आज 46 हजार पर्यंत संख्या वाढत चाललेली आहे. सुविधा आपण आवश्यकतेनुसार वाढवत चाललो आहे. बेड्स व्हेटिंलेटर, ऑक्सिजन जरी वाढले तरी डॉक्टर कसे वाढणार? आरोग्य सेवकांना कोरोनानं ग्रासले आहेत.


अनेक साईड इफेक्ट दिसून येतात. आरोग्य सेवक निगेटिव्ह आल्यानंतर लगेच ते आपल्या सेवेत येत आहेत.


टेस्टींग वाढवत आहेत, बोलणारे बोलतात लसीकरण वाढवले पाहिजे असं केलं पाहिजे. लसीकरणात एका दिवसात 3 लाख नागरिकांना लस दिलेली आहे.


65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे.


केद्रानं आणखी लस पुरवली पाहिजे, मी टीका करत नाही लस घेतल्यानंतर मास्क लावले पाहिजे.


लॉकडाऊन करायचं का? यात राजकारण आणू नका. अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये परिस्थिती गंभीर आहे.


वर्क फ्रॉम होम बंधनकारक, आवश्यक गोष्टींनाच परवानगी त्या ठिकाणी दिली.


लॉकडाऊन टाळू शकतो, पण परिस्थिती बदलत चालली आहे.


प्रत्येकानं ठरवलं पाहिजे मी कोरानाला हरवणार.


मी पहिल्या दिवसापासून सांगतो तेच आहेत. 




राजकीय पक्षाला विनंती आहे, लोकांची जीव जाईल असं वागू नका.


अर्थचक्र चालवायचं आहे जीव वाचवायचा आहे. मी लॉकडाऊनचा इशारा देतो.



लॉकडाऊन करणे हे राज्याच्या हिताचे नसून, राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंध सह मिनी lockdown चा सध्या विचार सुरू आहे.


टिप्पण्या