Break the chain: lockdown:महाराष्ट्र: राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध 15 मे पर्यंत पुढे वाढविला;काय आहे नवी नियमावली जाणून घ्या...

                                        file photo





मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन लावल्यानंतरही राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक दि चेन अंतर्गत'  कडक निर्बंधांची घोषणा केली होती. हे कडक निर्बंध 15 मेपर्यंत पुढे वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आता राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. या संदर्भात आज शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. 




कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत, असे राज्य सरकारने या आदेशात म्हटले आहे. आता लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे.



काय आहे नवी नियमावली


*या नियमावलीनुसार 15 मे पर्यंत  लॉकडाऊन काळात मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल.


सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट दिली आहे. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल.


खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी


सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. 




जिल्हा बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली, नियमांचे उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.



अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा 


केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा दोन तासात उरकावा लागणार आहे.  या नियमांचे पालन न झाल्यास  50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार.



नियम


*1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन


* 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन


*सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद


* सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद


* राज्यात जिल्हा बंदी लागू


* अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद


* सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी


* खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणासाठी परवानगी


* सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार


*एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार


* अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा


* खासगी वाहतूकदारांचे नियम मोडल्यास 10 हजार दंड


* सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती


* अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालय 15% हजेरीने चालणार


* लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी


* लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार


17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार


18. होम क्वारंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक


* कोरोना संक्रमित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार


* फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार




टिप्पण्या