Election: ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले- जयंत पाटील यांचा दावा

                                     File photo



मुंबई: राज्यात ग्रामपंचायत निडवणूक निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष सर्वाधिक जागा मिळविल्याचा दावा करीत आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याचा देखील समावेश झाला.जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविल्याचा दावा आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला.



“काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना तिन्ही पक्षांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत. सर्वात समाधानाची बाब ही आहे, यामध्ये  भाजपचे अस्तित्व फारच मर्यादित राहिले आहे. राज्यात महाआघाडीसमोर भाजपा २० टक्के देखील नाही”, असे जयंत पाटील यांनी आज प्रसार माध्यामांसमोर वक्तव्य केले. याशिवाय ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष सर्वात जास्त जागांवर विजयी झाला असल्याचा दावा देखील पाटील यांनी केला.


जयंत पाटील पुढे म्हणाले की, “माझ्याकडे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील निकालाची माहिती आहे. १३ हजार २९५ जागांच्या निवडणुका झाल्या आहेत. ३ हजार २७६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. काँग्रेसला १ हजार ९३८ जागांवर यश मिळाले आहे. भाजपाला २ हजार ९४२ जागांवर विजय मिळाला आहे. शिवसेना २ हजार ४०६ जागांवर विजयी झालेली आहे, अशी माझ्याकडे आलेली माहिती आहे. त्यामुळे आकडे बोलके आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातील पक्ष आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत.”





टिप्पण्या