Political news:अमित शहा यांनी दिला ममता बॅनर्जी सरकारला मोठा झटका ; तृणमूलचे आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात

         राजकारण:गल्ली ते दिल्ली

                                   (फोटो:ट्विटर)


 

भारतीय अलंकार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये जेंव्हा विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा २०० च्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. आज ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जोरदार झटका देत आजी माजी खासदारांसह ११ आमदारांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शहां यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश केला आहे. यामध्ये तापसी मोंडल, अशोक दिंडा, सुदीप मुखर्जी, सायकत पंजा, शिलभद्र दत्ता, दिपाली बिश्वास,  सुक्र मुंडा, श्यामदा मुखर्जी,विश्वजीत कुंडू आणि बन्सारी मैती यांचा समावेश आहे. 


अमित शहा यांनी ममता यांच्यावर यावेळी  टीका केली. ममता सांगतात की, भाजपा सर्व पक्षांतून नेत्यांची आयात करते. मात्र, त्यांना लक्षात आणून देवू इच्छितो की, त्यांचा मूळ पक्ष हा काँग्रेसचा होता. ही तर साधी लाट आहे. मी ज्या प्रकारची त्सुनामी पाहतोय, याची ममता यांनी कल्पनाही केली नसेल. ममता आता एकट्याच राहतील. जे लोक भाजपात येत आहेत ते लोक माँ-माटी-मानुषच्या नाऱ्यासोबत पुढे आले होते. आज त्या लोकांचा मोहभंग झाला आहे. 


मोदींनी गरीबांसाठी जे अन्नधान्य पाठविले ते तृणमूल काँग्रेसने फस्त केले. भाजपा अध्यक्षांच्या ताफ्यावर मोठमोठे दगड फेकले गेले. आम्ही यामुळे घाबरणारे नाही. प. बंगालच्या लोकांनी आता सत्तांतराचे मन बनविले आहे, असेही शहा म्हणाले. 



टिप्पण्या