Bharat band: भारत बंद:स्वाभिमानीने अडवली रेल्वे; रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे




भारतीय अलंकार

मलकापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारत बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेत  रेल्वे  अडविली. सकाळी ६.३० वाजता चेन्नई  अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 



केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात विविध राज्यातील शेतकरी बांधव तसेच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. या पृष्ठभूमीवर बुलडाण्यात विविध पक्ष संघटनानी आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून बंदचा परीणाम जाणवू लागला आहे तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.




आ.राजेश एकडे यांनी अडवला हायवे.



मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात नांदुरा येथे कृषी विधेयका विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.  केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा असून, आमदार राजेश एकडे यांनी व्यापा-यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्यासाठी केलेल्या आवाहनाला व्यापा-यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.




खामगाव बसस्थानकावर प्रवाशांची तारांबळ 


भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खामगाव बसस्थानकावर वाहनचालकांनी बसेस उभ्या करून दिल्या आहेत. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी ७ वाजेपासूनच बसेस उभ्या केल्याने बाहेर गावला जाणा-या नागरिकांची धांदल उडाल्याचे दिसून आले.



जामनेर कडकडीत बंद


जामनेर येथे महाविकास आघाडी तर्फे शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कसाठी शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला.


टिप्पण्या