BJP: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात;आघाडी सरकार विरोधात भाजपचे चुन-भाकर आंदोलन

दिवाळीच्या पर्वावर चुन भाकर, पिठलं भाकर देवून भाजपने काळी दिवाळी साजरी केली. 



अकोला: महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. विदर्भातील व मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सवांद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतू, आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड , ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी  ही दिवाळी काळी दिवाळी आहे, अश्या भावना व्यक्त करून, या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी चुन (बेसन) भाकर आंदोलन केले.





शेतकरी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर चुन भाकर, पिठलं भाकर देवून भाजपने काळी दिवाळी साजरी केली. भाजपा व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी धरणे दिले. चुन भाकर  ,खावून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही चुन भाकर खायला देण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला.



या मागण्यासाठी केले आंदोलन


१) महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी, सततच्या पाऊस व पुरामुळे झालेल्या शेती व पिकाचे फळबाग झालेल्या नुकसान भरपाई सरसकट दिवाळीपूर्वी कोरडवाहुला २५००० व बागायतीला हेक्टरी ५० हजार रुपये प्रमाणे देण्यात यावी. तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नये, कापसाची बोंडअळी बोंडसळी, सोयाबीन, धानाचे झालेले नुकसान, संत्राची फळगळती याकरिता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी.



२) केंद्राच्या MSP कायद्यान्वये १८ प्रकारच्या भरड धान्याची, कापसाची खरेदी केंद्र मुबलक प्रमाणात सुरु करावीत. व दिवाळीतही खरेदी सुरु ठेवावी.



३) यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अश्यक्य आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट करण्यात यावी.



४) हवामानवर आधारित फळ पीक विमा योजनेचे महाराष्ट्र सरकारने बदललेले निकष अन्यायकारक असून फक्त विमा कंपन्याच्या फायद्याचे आहेत. संत्रा केळी व इतर फळबागांच्या विमाचे बदललेले निकषते त्वरित रद्द करून जुने २०१८-१९ चे निकष कायम करण्यात यावे.



५) किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपने करण्यात यावी.



६) सध्या कृषी पंपाचे वितरण मार्च 2018 नंतर संपूर्णत बंद आहे ट्रान्सफार्मर जळला  तरी नादुरुस्त ट्रान्सफार्मर २४ तासात देऊन   दिवसा किमान वीजपुरवठा द्या.



७) रासायनिक खते, बियांनाचा रास्त दरात सुरळीत पुरवठा करा.



८) कृषी यांत्रिकीकरण, सुष्म सिंचन , नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करण्यात यावे.



या सर्व मागण्यांकरिता भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आंदोलन केले. महामंत्री  चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. 


अकोला

अकोला भाजपने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज 'बेसन भाकर' आंदोलन केले. यावेळी आंदोलकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, महापौर अर्चना मसने,किसान आघाडीचे वैकुंठराव ढोरे, माजी महापौर तथा शहराध्यक्ष विजय अग्रवाल, ऍड. देवशीष काकड, यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. आमदार सावरकर यांनी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदन दिले.यावेळी सावरकर यांनी खडसे यांना बेसन भाकर खावू घालण्याचा प्रयत्न केला.


अमरावती

अमरावती येथे माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात चुन - भाकर आंदोलन करण्यात आले.दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांसह बेसन भाकर खाऊन शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ललित समदूरकर, कमलसिंह चितोडीया यांच्यासह  शेतकरी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.



दर्यापूर

भाजपा किसान मोर्चा अमरावती ग्रामीणच्या वतीने तहासिलदार दर्यापूर यांना झुणका भाकर खाऊ घालून, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात करणाऱ्या राज्य सरकारचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखेडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल गोळे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला.







टिप्पण्या