- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यां समवेत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हाथरस पोलिसांकडून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी जात होते, यावेळी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सचित्र वृत्त एएनआय (यूपी) या संस्थेने आपल्या ट्विटर हँडल वरून दिले आहे.
कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आल्याचे कळते. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेसच्या प्रियांका गांधी, रणदीप सुरजेवाला यांनी यूपी सरकारचा निषेध केला.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस मधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखले. राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना पाहिले अडविले. नंतर धक्का दिला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडले. कार्यकर्त्यांना सुद्धा मारहाण केली, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का ? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का ? आमचे वाहन थांबवण्यात आले म्हणूनच चालत निघालो होतो”.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यां समवेत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.
हाथरस जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. यामुळे सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत,असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Photo:(ट्विटर)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा