- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राज्य शासनाने आता नवरात्रीच्या नियमांची वेळीच स्पष्टता द्यावी-भाजप
मुंबई: महाराष्ट्र शासनाकडून गणेशोत्सवाची नियमावली जाहीर होण्यास विलंब झाल्याने मुर्तीकरांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आता नवरात्रीच्या नियमांची वेळीच स्पष्टता द्या,अशी मागणी भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आज एका पत्राद्वारे केली आहे.
गणेश मुर्तींची लगबग संपली की, मुर्तीकार देवीच्या मुर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे यावेळी कोरोनामुळे देवीच्या मुर्तीची उंची किती असणार? सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? याबाबतची स्पष्टता वेळीच मुर्तीकरांना द्या, अशी मागणी शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
नवरात्री उत्सवाच्या गाईडलाईन वेळीच जाहीर करण्या बाबत शेलार यांनी मुख्यमंत्री याना पत्र लिहले आहे.
गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी लगेचच सुरु होते. विशेषत: देवीच्या मुर्ती बनविण्याची सुरुवात तातडीने केली जाते. गणेश मुर्तीची लगबग संपली की,मुर्तीकार देवीच्या मुर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे यावेळी कोरोनामुळे देवीच्या मुर्तीची उंची किती असणार? सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? गणेशोत्सवाचेच नियम याही उत्सवाला लागू राहणार? कि त्यात बदल करणार? याबाबतची स्पष्टता वेळीच मुर्तीकारांना देण्याची आवश्यकता आहे.
कोरोनामुळे गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकार व कारखान्यांना मोठा फटका बसला आहे.मुर्तीची उंची बाबत स्पष्टता येण्यास विलंब झाल्याने कारखान्यात ४ फुटापेक्षा उंच असलेल्या मोठ्या मुर्ती शिल्लक राहिल्या आहेत. तसेच कोरोना मुळे गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने मुर्तीकारांना त्याचा फटका बसला.
पेण मधील दोहे, हमरापुर, केळवे या सारख्या मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तीचे मूर्तिकार आणि कारखाने असलेल्या गावांना गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बहुसंख्य तेच मूर्तीकार त्याच कारखान्यात पुन्हा देवीच्या मुर्ती घडवित असल्याने त्यांना वेळीच सरकारने स्पष्टता देण्याची गरज आहे.
मुंबईतील मुर्तीकारांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, मुंबई शहरात देवीच्या मुर्ती घडविणारे सुमारे पाच हजार मूर्तीकार व कारखाने आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर मुर्तीच्या उंची बाबत प्रश्न चिन्ह आहे.
मुर्तीकार ही एक छोटी इंडस्ट्री असून त्यावर हजारो मुर्तीकार, कामगार, कारागीर यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कोरोनाची झळ जशी अन्य उद्योगांना बसली तशीच झळ याही उद्योगांना बसली आहे. आपण त्यांना वेळीच स्पष्टता दिल्यास त्या उद्योगाचे होणारे नुकसान टळू शकेल. म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की, गणेशोत्सवा प्रमाणे नवरात्री उत्सवाच्या नियम,नियमावलीचा शासन निर्णय वेळीच घ्यावा. किंबहुना तातडीने त्याबाबत संबंधीतांची बैठक घेऊन शासन निर्णय जारी करावा,असे या पत्रात लिहले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा