corona virus:धक्कादायक :गेल्या २४ तासात राज्यात चार पत्रकारांचे कोरोनाने निधन; महिनाभरात १९ पत्रकार मृत्युमुखी Shocking: In the last 24 hours, four journalists died in the state due to corona

धक्कादायक :गेल्या २४ तासात राज्यात चार पत्रकारांचे कोरोनाने निधन; महिनाभरात १९ पत्रकार मृत्युमुखी 


Shocking: In the last 24 hours, four journalists died in the state due to corona

राज्यभरातील पत्रकारांनी वाहिली एकाचवेळी भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राला हादरून टाकणारया आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारया बातम्या सातत्यानं येत आहेत. संतोष पवार यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजून माध्यम क्षेत्र सावरलेले नसतानाच गेल्या २४ तासात राज्यात 4 पत्रकारांचे निधन झाल्याची बातमी असून राज्यातील अनेक पत्रकार कोरोनाशी लढा देत असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे माध्यमात चिंतेचे वातावरण आहे.



पत्रकारांना बातम्यांसाठी सातत्यानं बाहेर पडावे लागत असल्याने बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.. अनेकदा योग्य आणि वेळेत उपचार मिळाले नाही तर पत्रकारावर मृत्यूची वेळ येते हे संतोष पवार आणि पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूमुळे समोर आले आहे.


 
नागपूर येथील लोकशाही वार्ताचे पत्रकार नितीन पातघरे यांच्याबाबतीत देखील निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले असून सरकारी अनास्थेनं त्यांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. 



नागपूर मेट़ो समाचार व इन बीसीएन न्यूज चॅनेलचे वाडी येथील पत्रकार सुनील शेट्टी याचंही काल कोरोनानं निधन झालं. नागपूर येथीलच आणखी एक पत्रकार सागर जाधव देखील आपणास सोडून गेले आहेत.



ठाणे येथील ठाणे टाइम्सचे संपादक आणि मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ठाणे शहर पत्रकार संघाचे सहसचिव प़शांत कांबली यांचं आज निधन झालं. अस्वस्थ वाटू लागलयानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.



 
कोरोना किंवा कोरोना सदृश्य आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 19 वर पोहोचली आहे. यातील बहुतेक जण पन्नासच्या आसपासच्या वयोगटातील होते.. यापैकी सरकारने किंवा हे पत्रकार ज्या माध्यम समुहासाठी काम करीत होते त्यांनी कोणालाही कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही.



 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पत्रकारांनी आपली काळजी घ्यावी, शक्यतो बाहेर पडणे टाळावे, मास्क तसेच सोशल डिस्टस्टिंगचे पालन करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे एस.एम.देशमुख यांनी केले आहे.





व्यवस्थापनाने पत्रकारांना  विमा संरक्षण द्यावे : सिद्धार्थ शर्मा    


राज्यातील १५ दिवंगत पत्रकार श्रद्धांजली                     


अकोला :कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना त्यांच्या व्यवस्थापनाने विमा संरक्षण द्यावे आणि शासनाने घोषित केलेली ५० लाखाची आर्थिक मदत तातडीने द्यावी. अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी केली. शुक्रवारी दुपारी आयोजित अकोला पत्रकार संघाच्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.




मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस आणि माथेरानचे पत्रकार संतोष पवार आणि राज्यातील अन्य १५ दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी राज्यभर शुक्रवार दि.११ रोजी राज्यभरात  दुपारी श्रध्दांजली सभा घेण्यात आल्या. 

  
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमूख यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सभा घेण्यात आल्या.   
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ३५ जिल्ह्यात  सोशल डिस्टस्टिंगचे    पालन करीत सभा पार पडल्या.   


अकोला पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, संजय खांडेकर, उमेश अलीने, दीपक देशपांडे, जयेश जगड, अजय चौहान, कमल शर्मा, मुकुंद देशमुख, बी.एस.इंगळे, समाधान खरात, निसार शेख उपस्थित होते.




200 तालुक्यात  संतोष पवार
यांना पत्रकारांनी वाहिली श्रद्धांजली


माथेरान येथील पत्रकार, परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार आणि राज्यात गेल्या  महिनाभरात मृत्यूमुखी पडलेल्या 19 पत्रकारांना आज 200 च्या वर  तालुक्यातील पत्रकारांनी श्रद्धांजली अर्पण केली.



गेल्या महिनाभरात राज्यात 20 पत्रकारांचे निधन झाले आहे. परवा मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार यांचे अकाली निधन झाले.. मराठी पत्रकार परिषदेसाठी हा मोठा थक्का होता.



परिषदेने संतोष पवार आणि अन्य दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज राज्यभर श्रध्दांजली सभांचे आयोजन केलं होतं. त्यानुसार राज्यातील 200च्या वरती तालुका आणि जिल्हा संघांनी संतोष पवार आणि दिवंगत पत्रकारांना श्रेध्दांजली वाहिली. उर्वरित तालुक्यात लवकरच श्रध्दांजली सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन, सोशल मिडिया सेलचे प्रमुख बापुसाहेब गोरे, महिला संघटक जान्हवी पाटील यांनी सर्वाचे आभार मानले आहेत.




टिप्पण्या