- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
यंदाच्या रक्षा बंधनाला तब्बल २९ वर्षानंतर जुळून आला महासंयोग
भारतीय अलंकार
अकोला: भारतीय सणांमध्ये एक मुख्य राखी पौर्णिमा. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून राखी बांधते. भाऊ सुद्धा आपल्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. बहीण भावाचे हे अतूट नाते या पवित्र धाग्याने जन्मोजन्मसाठी गुंफले जाते. यंदाचा राखी पौर्णिमा सणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.कारण यंदा तब्बल २९ वर्षांनी महासंयोग जुळून येत आहे. विशेष म्हणजे सोमवारी आली असल्याने बहीण भावाच्या नात्यासाठी अधिकच शुभ असल्याचे जोतिष्य शास्त्रानुसार मानले जाते.
सोमवार ३ ऑगस्ट रोजी दिवसभर रक्षाबंधनचा सण शुद्ध आहे (भद्रा सकाळी ९.३० वाजेपर्यंत आहे).यावेळी रक्षाबंधन देखील सर्वार्थ सिद्धि आणि आयुष्मान दीर्घायुषी यांचे संयोजन होणार आहे, यामुळे यावेळी रक्षाबंधन खूप शुभ होणार आहे.
रक्षाबंधनासाठी शुभ वेळ
असे म्हणतात की, भद्राच्या काळातच रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली, त्यामुळे रावणाचा नाश झाला. ३ ऑगस्ट रोजी भद्रा सकाळी ९.२९ वाजता आहे. राखी सण सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू होईल. दुपारी १.३५ ते दुपारी ४.३० या वेळेत रक्षा बंधन साठी खूप चांगली वेळ आहे. यानंतर संध्याकाळी ७.३० ते ९.३० ही खूप चांगली शुभ वेळ आहे.
रक्षाबंधनाला २९ वर्षानंतर महासंयोग
रक्षाबंधनाच्या दिवशी खूप चांगले ग्रह नक्षत्रांचे मिश्रण बनत आहे. या दिवशी सर्व प्रयोजनार्थ सिद्धि योग केला जात आहे. या संयोजनात, सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात. यादिवशी आयुष्मान दीर्घायुष्य योग आहे, म्हणजे दोन्ही भाऊ-बहिणींचे आयुष्य दीर्घायुषी होईल. ३ ऑगस्ट रोजी चंद्राचा फक्त श्रावण नक्षत्र आहे. मकर, शनि आणि सूर्य यांचा स्वामी आपापसांत एकत्रित योग बनवित आहेत. शनि आणि सूर्य दोन्ही आयुष्य वाढवतात. हा योगायोग २९ वर्षांनंतर आला आहे.
नारळी पौर्णिमा:राखी पोर्णिमा:रक्षाबंधन
श्रावण शुद्ध पौर्णिमेला नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा तर काही प्रांतात रक्षा बंधन असे म्हणतात. यादिवशी भावाचे औक्षण करून बहीण त्याला राखी बांधते. भाऊ तिच्या सर्वतोपरी रक्षणाची हमी देतो, असा रक्षाबंधनाचा हेतू आहे.
यादिवशी नारळी भात, खोबऱ्याच्या वड्या,खोबऱ्याचे लाडू आदी नारळा पासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. घराच्या सभोवताली मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी यादिवशी बहिणी अंगणात सडा घालून रांगोळ्या काढतात. केळी, आंब्याच्या पानांची तोरणे बांधतात. नवी वस्त्रे परिधान करून भावाला ओवाळतात.या सणाचा उत्साह भारतात मोठा असतो.
कोळी बांधवांचा मुख्य सण
समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमेला आनंदात असतात.समुद्राला मानाचा नारळ देऊन होड्या समुद्रात मासेमारीसाठी घातल्या जातात. पावसाळ्यात मासेमारी केल्या जात नाही.मात्र, नारळी पौर्णिमेपासून मासेमारी करण्याला प्रारंभ करतात. जलदेवतेचा कोप होऊ नये, जीवितहानी होऊ नये म्हणून जलदेवतेच्या नावाने नारळास वाशी बांधून, नारळ पाण्यात टाकतात. समुदाची पूजा केली जाते. काही जण तांब्यात नाणी टाकतात व तो ताम्ब्या जलपवाहाला अर्पण करतात. या दिवशी कोळीवाड्यात नाच-गाणी न करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा