School education:प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून - राज्यमंत्री बच्चू कडू

प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून  - राज्यमंत्री बच्चू कडू

*पाचवीचे 21 जुलैपासून ऑनलाईन वर्ग

 *सक्तीने शुल् वसुली करणाऱ्या     शाळांवर कारवाई

 *पहिलीदुसरीच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी

अमरावतीराज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेतया परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे गरजेचे आहेयासाठी दहावी आणि बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेतसेच  २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेअशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदिली.

सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरू करण्यासंदर्भात आज येथील जिल्हा शिक्षण  प्रशिक्षण संस्थेत कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आलीयावेळी उपसंचालक अंबादास पेंदोरजिल्हा शिक्षण  प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रविंद्र आंबेकर यांच्यासह पाचही जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीकडू म्हणालेखासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहेयामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेलयावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरू होणे गरजेचे आहेयासाठी पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेयामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरू करण्याचे नियोजन करावेशाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून इतरही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेतशाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात यावायासाठी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांची मदत घ्यावी.
प्रत्यक्ष शिक्षण पद्धती इतर कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त प्रभावी आहेपरंतु सध्यास्थिती लक्षात घेता इतर वर्गाच्या शाळा ऑनलाईन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेतअमरावती विभागात सुमारे एक लाख 19 हजार विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाहीत्यांच्यापर्यंत कशाप्रकारे शिक्षण पोहोचविता येईलयाचाही विचार होणे गरजेचे आहेशिक्षण देण्याच्या इतर पद्धती सुचविण्यात याव्यातज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेतत्याठिकाणी किती अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहेयाबाबतही अहवाल मागविण्यात यावातसेच विलगीकरणासाठी शाळा उपयोगात आणल्या आहेतया शाळा पुन्हा ताब्यात घेतेवेळी निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात.
शासनाने पहिली आणि दुसरीचे ऑनलाईन शिक्षण घेऊ नयेअसा निर्णय घेतला आहेतरीही काही शाळा केवळ शुल्क वसुल करण्यासाठी वर्ग घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.  मात्र याबाबत अद्यापपर्यंत एकाही शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाहीतसेच काही शाळा विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्यासाठी सांगत आहेतमनाई असताना काही शाळेतच पुस्तक विक्री करण्यात येत आहेयानंतर तक्रार प्राप् झाल्यास शाळा व्यवस्थापनासह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून फौजदारी कारवाई करण्यात येईलअसेही श्रीकडू यांनी सांगितले.

टिप्पण्या