corona virus news:अकोल्यात एकाच दिवशी ३७ पॉझिटीव्ह; एकाचा मृत्यू पॉझिटिव्ह असलेले आतापर्यंत एकूण २५७

अकोल्यात एकाच दिवशी ३७ पॉझिटीव्ह; एकाचा मृत्यू


पॉझिटिव्ह असलेले आतापर्यंत एकूण २५७

अकोला,दि.१७ :आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १७६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३९ अहवाल निगेटीव्ह तर ३७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २५७ झाली आहे. मुर्तिजापुर येथील एक व्यक्ती मयत झाला असून आज सकाळी १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजअखेर प्रत्यक्षात १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २५५१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २४१४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २१५७ अहवाल निगेटीव्ह तर २५७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  १३७ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण २५५१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २३३०, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ नमुने होते. आजपर्यंत एकूण २४१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २१९३ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २१५७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २५७ आहेत. तर आजअखेर १३७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज ३७ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १७६ अहवालात १३९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ३२ रुग्णात १० महिला व २२ पुरुष होते. त्यात एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. या रुग्णांपैकी तारफ़ैल-चार,माळीपूरा-चार, खैर मोहम्मद प्लॉट-चार, आंबेडकर नगर-तीन, ताजनापेठ-तीन,अकोट फ़ैल-तीन तर मुर्तिजापूर,आगरवेस,बिरलागेट जठारपेठ,खरप, काळा मारोती, ओल्ड आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा,रामदासपेठ पोलीस क्वांर्टर, नायगाव,खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी  आहेत. तर सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या पाच जणांपैकी तीन पुरुष व दोन महिला आहेत. त्यातील तिघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य अकोट फ़ैल व डाबकी रोड येथील रहिवासी आहेत.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण मयत असून तो दि.१३रोजी मयत झाला आहे. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण ४८ वर्षीय पुरुष असून मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे.

१७ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज १७ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यातील १२ जणांना घरी तर उर्वरित  पाच जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. घरी सोडण्यात आलेल्या १२ जणांपैकी  पाच जण माळीपुरा येथील, तीन जण मोहम्मद अली रोड येथील तर खंगनपुरा, न्यु भीमनगर, अकोट फैल, गुलजारपुरा  येथील प्रत्येकी एक जण आहेत. तर ज्या पाच जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे ते पाचही जण तारफैल भागातील रहिवासी आहेत.


१२२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत  २५७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १८ जण (एक आत्महत्या व १७ कोरोनामुळे) मयत आहेत. आज रविवार दि.१७ रोजी  १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११७ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आजअखेर २४६२ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १६४३ गृहअलगीकरणात तर पाच जण संस्थागत अलगीकरणात्र  असे १६४८ जण अलगीकरणात आहेत. तर ६८१ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १३३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली


राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या लोकांना अलगीकरण अनिवार्य


कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून अकोला जिल्ह्यात विविध तालुक्यात येणाऱ्या लोकांना  वैद्यकीय तपासणी व त्यानंतर दहा दिवसांसाठी अलगीकरण हे अनिवार्य आहे. ज्या नागरिकांकडे घरी गृह अलगीकरण राहण्याची व्यवस्था नसेल त्यांना त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये  किंवा आवश्यकतेनुसार अन्यत्र अलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

यासंदर्भात  बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यास डॉक्टरी सल्ल्यानुसार  दहा दिवस अलगीकरणात राहणे अनिवार्य आहे. जर अशा व्यक्तींच्या घरी अलगीकरणात राहण्याची व्यवस्था नसेल तर त्या त्या गावच्या जिल्हा परिषद शाळेत अथवा अन्यत्र व्यवस्था करावी. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी निर्देश दिले होते.

जिल्ह्यात आतापर्यंत ५९८८ लोकांना जिल्हा प्रशासनाने ई- पास दिले आहेत. त्यात अकोला तालुक्यात ३६५३, अकोट तालुक्यात ५४०, बाळापुर तालुक्यात ३४७, बार्शी टाकळी ३३४,  मुर्तिजापूर ४६८, पातूर ३१४, तेल्हारा ३३२ असे एकूण ५९८८ ई पासेस देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक यंत्रणांनी या नागरिकांच्या अलगीकरणाची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या