३० मजूर आणि विद्यार्थी गेले पळून

३० मजूर आणि विद्यार्थी गेले पळून 

https://youtu.be/-YhSeJiKaXA

विद्यार्थी व मजुरांचे पलायन

अकोला:जिल्ह्यातील पातूर मधून ३० मजूर आणि विद्यार्थी पळून गेल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघड झाला होता   या सर्व जणांना पातूरातील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात आश्ररित होते. हे सर्व मजूर आणि विद्यार्थी तेलंगानातील असून त्यांचा प्रवास झाला होता. त्यामुळे त्यांना ३० मार्चपासून पातूरात थांबण्यात आले होते. या ठिकाणी या ३० जणांना योग्य त्यासर्व सुख सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस यंत्रणा येथे कार्यरत असूनही ३० जणांनी पळ कसा काढला, असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन आता फरार लोकांचा शोध घेत आहे. महत्वाचं म्हणजे हे सर्व पॉझिटिव्ह किंवा संदिग्ध रुग्ण नसून त्यांना लॉकडाउन संपेपर्यंत किंवा पुढील आदेशपर्यंत आश्रित होते.


टिप्पण्या