आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू

आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू
मुख्यमंत्री यांच्या “लाईव्ह” प्रसारणातील महत्वाचे मुद्दे

   20 मार्च 2020 
1.आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.

2.जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. 

3.महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका. 

4.रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.

5.जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील 

6.अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील

7.बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील 

8.शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.  

9.आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत. 

10.ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा. 

11.चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत. 

12.  ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल

13.सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद 

14.अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती 

15.पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.

टिप्पण्या