- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
political-news-akola-congress: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरवले आहेत… पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - अकोला काँग्रेसची मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*जिल्ह्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या पालकमंत्री विखेंनी राजीनामा द्यावा.
*ना राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याच्या इतीहासातील सर्वात अपयशी व निष्क्रीय पालकमंत्री.
*पालकमंत्री हरवले आहेत असा कॅंम्पेन राबवणार.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्यातील आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय व अपयशी पालकमंत्री ठरले आहेत. पालकमंत्री जिल्ह्याकडे करत असलेले दुर्लक्ष पाहता काँग्रेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरवले आहेत, अशा पद्धतीचे अभियान राबविणार असल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिली.
स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे आज संपन्न पत्रकार परीषदेत यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व कांग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार राहीलेले डॉ. अभय पाटील, जिल्हा काँग्रेस महासचिव अतुल अमानकर, महासचिव अंशुमन देशमुख, महासचिव विजय देशमुख, पवन गावंडे उपास्थित होते.
यावेळी ढोके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अपयशी कारभाराचा पाढाच वाचला. पालकमंत्र्यांचा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय बाबींवरती अंकुश असायला पाहिजे. परंतु पालकमंत्री हे गत फेबृवारी महीन्यापासुन जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. त्यांनी अवकाळी पाऊसामुळे नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी करण्याचे साधे सौजन्य ही दाखवले नाही. अनेक प्रशासकीय कामे जिल्ह्यामध्ये प्रलंबीत असून ह्याचा आढावा सुद्धा पालकमंत्री विखे ह्यांनी घेतलेला नाही. अत्यंत महत्वाच्या खरीपाच्या नियोजन बैठकीला सुद्धा विखे पाटील उपस्थीत नव्हते, तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बियाणे व खताचा तुटवडा असतांना पालकमंत्री शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडुन पुत्राच्या निवडणुक प्रचारामध्ये व्यस्त होते, असा आरोप ढोके यांनी यावेळी केला.
यावेळी डॉ अभय पाटील यांनीही या संदर्भात माहिती दिली. अनेक बॅंकांमध्ये पिककर्जा साठी शेतकरी चकरा मारत आहेत बॅंका पिक कर्ज देतांना शेतकऱ्यांची अडवणुक करंत आहेत अशा वेळी पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे असतांना पालकमंत्री जिल्ह्याकडे ढुंकुणही पाहत नाहीत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे २६ फेब्रुवारीच्या रात्री गारपिटीसह झालेल्या अवकाळी ने चार तालुक्यातील ९ हजार १५२ हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने २२ मार्च रोजी शासनाला सादर केला. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ११ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या करिता ३२ कोटी ९५ लाख ९६ हजार ३८ रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव १४ मे रोजी शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे ५४ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. पेरणी संपत आली तरी ही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही आणी पालकमंत्री विखे ही मदत शेतकऱ्यांना मिळवुन देण्यातही अपयशी ठरले आहेत. ह्यासह जिल्ह्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी हे महत्वाचे पद मे २०२३ पासुन रिक्त आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद ४ महीन्यांपासुन रिक्त आहे. ह्या कडे लक्ष द्यायला सुद्धा पालकमंत्री विखे पाटील ह्यांना अद्याप वेळ मिळाला नाही. डिपीसी वर अजुनही कार्यकाळ संपत आला तरीही जिल्हा परीषदेमधील ओबीसी सदस्य नियुक्त केलेले नाहीत. जिल्ह्यामध्ये पाणंद रस्ते शेतकऱ्यांच्या मागणी नुसार न झाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. शेत मोजणीचे हजारो प्रकरणे भुमी अभिलेख विभागाकडे प्रलंबीत आहेत त्यावर सुद्धा कुणाचे नियंत्रण नाही.
अश्या प्रकारच्या अनेक समस्या ह्या जिल्ह्यासमोर आहेत. अशा परिस्थीतीत पालकमंत्र्यांनी प्रशासनावर अंकुश ठेवणे आवश्यक असतांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांना जिल्ह्याकडे पहायला सुद्धा वेळ नाही म्हणजे पालकमंत्र्यांनीच जिल्ह्याला अनाथ केले, अशी परिस्थीति आहे. त्यामुळे पालकमंत्री विखे पाटील यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा