- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Nana patole: political: मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून केंद्र-राज्य विभाजनाचं पाप केलं-नाना पटोले यांचा आरोप
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुंबई: मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून केंद्र-राज्य विभाजनाचं पाप केलं,असा आरोप करीत, आता मात्र त्यांनी आपली चूक मान्य करुन लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण ठरवावे. राज्यांमध्ये कुठलाही भेदभाव न करता लस उपलब्ध करुन द्यावी. लस कुठून आणणार, कधीपर्यंत देणार याबाबतीत स्पष्टता आणावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबईतील अ-९ या निवासस्थानी नाना पटोले आज पत्रकारांशी बोलत होते.
केंद्र सरकारने १७% लोकांचं लसीकरण केल्याचं जाहीर केलं. पण लसीचे २ डोस किती लोकांना मिळाले? कोवॅक्सिन आणि सिरमने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तेवढी लस भारताला दिलीच नाही मग या एवढ्या लसी आल्या कुठून? मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा, असे देखील नाना पटोले म्हणाले.
भाजपचे लोक गांधी परिवारावर टीका करून अजून किती दिवस राज्य करणार? एम्स असो रुग्णालये असो तसेच सगळ्या व्यवस्था असो, देशाला उभं करण्याचं काम काँग्रेसने केलं. भाजपप्रमाणे लसीकरण बाजूला सारून सेंट्रल विस्टावर २० हजार कोटी खर्च करण्याचं पाप आम्ही नाही केलं, असे देखील नाना पटोले म्हणाले.
सुरवातीला केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही मोफत लस देतो आहे. नंतर मात्र त्यांनी आपली जबाबदारी झटकल्याने ती जबाबदारी राज्यांना उचलावी लागली. केंद्र सरकारने लसीकरणाबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करावं आणि त्याबद्दलची स्पष्टता लोकांसमोर आणावी, असे पटोले म्हणाले.
'सर्वोच्च न्यायालय तज्ज्ञ नाही. त्यांनी कोविडच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करु नये' ही मोदी सरकारची भूमिका संविधानिक व्यवस्थेलाच न मानणारी आहे. कोलगेट किंवा २जी प्रकरणात आम्ही अशाप्रकारची वक्तव्य केली नाही. कारण न्यायालयांना आम्ही लोकशाहीचा आत्मा मानतो, असे नाना पटोले यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार कोवीड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणा मुळे लसीकरण मोहीम फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसुत्रता दिसत नाही म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, असे पटोले म्हणाले.
पटोले पुढे म्हणाले की, लोकशाही शासन व्यवस्थेत न्यायव्यवस्था ही आत्मा समजली जाते परंतु मोदी सरकारने हा आत्माच संपवण्याचे काम सुरु केले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात असल्याची चुकीची माहिती सुप्रीम कोर्टात सादर करुन कोर्टाने कोविडमध्ये हस्तक्षेप करु नये, कोर्ट या विषयातील तज्ञ नाही असे म्हणत कोर्टाचा अवमान केला आहे. नोटाबंदी जाहीर करताना नरेंद्र मोदींनी कोणत्या अर्थतज्ञांचा सल्ला घेतला होता का? नरेंद्र मोदी अर्थतज्ञ आहेत का ? तसे नसतानाही नोटंबदी जाहीर करुन लोकांना वेठीस धरले. सुप्रीम कोर्टात यापूर्वी कोलगेट, टू जी प्रकरण आले होते त्यावेळच्या युपीए सरकारने कोर्टाला अशा प्रकारे हस्तक्षेप करु नका असे म्हटले नव्हते. सुप्रीम कोर्टाने देशातील कोविडची विदारक परिस्थिती पाहून टास्क फोर्स स्थापन केला आहे. केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या जीवाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले असून कोर्टाने टास्क फोर्स स्थापन केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आकलन करुन मोदी सरकारने नियोजन केले नाही त्यामुळे हजारो लोक ऑक्सीजन, योग्य आरोग्य उपकरणे, पुरेशा लसींअभावी लोक मरत आहेत. लस नाही, औषध नाही, ऑक्सीजन नाही, पीएम केअरमधून पुरवलेली उपकरणेही दुय्यम दर्जाची आहेत. मोदींचे आपत्ती धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन किती पोकळ आहे याची जागतिक प्रसारमाध्यमांनी पोलखोल केली आहे. कोविड महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही असा संदेश जगभरात गेला असून भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता पण मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा तसेच नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली आहे,असा आरोप पटोले यांनी केला.
भारत पहिल्यांदाच राष्ट्रीय महामारीचा मुकाबला करत नाही. यापूर्वी आलेल्या गोवर, देवी तसेच पोलीओचा मुकाबला भारताने समर्थपणे केले आहे. २० कोटी बालकांचे पोलीओ लसीकरण केले त्यावेळी पोर्टल, ऍप, ओटीपी असे काही नव्हते तरीही ठोस धोरण आखून तत्कालीन काँग्रेस सरकारने पोलीओचे समूळ उच्चाटन करुन दाखवले, ती धमक मोदी सरकारमध्ये दिसत नाही,असे पटोले म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कोरोना संकटाच्या गंभीर परिणामाचा इशारा मोदी सरकारला दिला होता. वेळीच त्यांचा सल्ला ऐकून कार्यवाही केली असती तर देशाला आजच्यासारख्या विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते. केवळ सत्तेचा अहंकार व विरोधी पक्षाची दखल घ्यायची नाही या विकृत मानसिकतेतून केंद्रातील मंत्री, भाजपा नेते हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्यात तसेच भाजपाच्या आयटी सेलकडून ट्रोल करण्यातच वेळ घालवला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे सोनियाजी व राहुलजी यांच्याबद्दलचे कालचे वक्तव्य हे सुद्धा त्यांच्या विकृत मानसिकतेतूनच आले आहे. विरोधकांनी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी केली असती तर आज दिसत असलेले भयनाक दृश्य पहावे लागले नसते. हजारो-लाखो जीव वाचले असते तसेच भारताची जगात एवढी नाचक्की झाली नसती, असेही पटोले म्हणाले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा