Bharat band: शिवसेनेचे जनतेला आवाहन:भारत बंद हा राजकीय बंद नाही; स्वेच्छेने समर्थन द्यावे- संजय राऊत

लॉकडाऊनच्या काळात आपण घरात  असताना एकटा शेतकरी राजा राबत होता.



भारतीय अलंकार

मुंबई: कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज या संदर्भातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना राज्यातील जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे. 



उद्याचा बंद हा वेगळ्या प्रकारचा बंद आहे. यात राजकीय पक्षांचा सहभाग असला तरी हा राजकीय बंद नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या वा संघटनेच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा बंद नाही. देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडी, वारे व सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता जे शेतकरी बांधव बसले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद आहे,' असे राऊत म्हणाले.



लॉकडाऊनच्या काळात आपण घरात बसलेलो असताना एकटा शेतकरी राजा राबत होता. आज त्यांनी आपल्याला साद घातली. त्याला आपली गरज आहे. आता आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवे. त्यामुळे जनतेने स्वेच्छेने भारत बंदमध्ये सहभागी होवून, बळीराजाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी,' असे आवाहन राऊत यांनी केले आहे.




टिप्पण्या