- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"दार उघड उद्धवा दार उघड"
मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा!
मंदिरे सुरु करा या मागणी करिता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. 29 ऑगस्ट रोजी स. 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन - आचार्य तुषार भोसले , संयोजक आध्यात्मिक समन्वय आघाडी.
अकोला: मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, अशी सूचना जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे. यांनी बुधवारी केली.
आमदार रणधीर सावरकर व महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे.
ते म्हणाले की, केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही. "ठाकरे सरकार"ला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर "दार उघड उद्धवा दार उघड" अशी हाक देत "घंटानाद आंदोलन" विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजपा पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील.
ते म्हणाले की, तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे.
मंदिरे सुरु करा या मागणी करिता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. 29 ऑगस्ट रोजी स. 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन - आचार्य तुषार भोसले , संयोजक आध्यात्मिक समन्वय आघाडी.
अनेक वेळा मागणी करुनही महाराष्ट्र सरकार देवस्थाने सुरु करण्याची परवानगी देत नाही, यासंबंधी विचार- विनिमय करण्यासाठी व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक-आध्यात्मिक संघटना, संस्था, प्रमुख देवस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त आणि विविध पंथ- संप्रदायांच्या प्रमुख धर्माचार्यांची आभासी बैठक मंगळवार झाली.
बैठकीस मान्यवरांची उपस्थिती
डाॅ. सुरेश हावरे , अध्यक्ष श्री. साईबाबा संस्थान, शिर्डी
महेश जाधव , अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर.
अतुल भोसले , माजी अध्यक्ष,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर.
सुमंत घैसास , विश्वस्त , श्रीसिद्धिविनायक मंदिर , मुंबई.
खा. जयसिद्धेश्वर महास्वामीजी , विरशैव लिंगायत संप्रदाय
ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, विश्वस्त, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर
ह.भ.प.. प्रकाश महाराज जवंजाळ, विश्वस्त, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर
ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.वारकरी मंडळ
महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, कोषाध्यक्ष, अ.भा. संत समिती
पंडित सतिष शंकर शुक्ल ,राष्ट्रीय उपाध्यक्ष,अ.भा. पुरोहित संघ
सुदर्शन महाराज कपाटे , प्रतिनिधी: महानुभाव पंथ
गुरुमुख जगवानी , राष्ट्रीय प्रमुख, सिंधी ग्लोबल ट्रस्ट.
गुरुप्रितसिंग सोखी , प्रतिनिधी, हुजूर साहेब गुरुद्वारा, नांदेड
भुषण कासलीवाल , प्रतिनिधी, जैन संघटना .
उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत पुढीलप्रमाणे विचार विनिमय झाला :
गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे भाविक समाज मानसिकदृष्या खचलेला आहे. या समाजाला आपल्या आराध्य देवतेचे भजन, पूजन, कीर्तन आणि दर्शन करुन मानसिक आधार मिळणे अपरिहार्य आहे. केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करणे बाबत दि. ४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे ; त्यानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे खूप वेळा मागणी केली. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात माॅल, मांस, मदिरा चालु झाले आणि देवस्थाने मात्र बंद आहेत. "पुनश्च हरि ओम" च्या नावाखाली सर्व व्यवहार सुरु झाले आणि "हरि" ला मात्र लाॅक करुन ठेवले आहे. यापेक्षाही वाईट म्हणजे दारु पिणारे आनंदात फिरत आहेत तर भजन-पूजन करणारे भाविक भक्त यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत आहे. आस्थेबरोबरच, तिर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचे जीवन व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत.
या बैठकीत एकमुखाने पुढील ठराव संमत करण्यात आला -
"राज्यशासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन ,पूजन कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही , महाराष्ट्रातले मविआ सरकार ती अजूनही मान्य करत नाही. कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या या "ठाकरे सरकार"ला इशारा देण्याकरिता भाद्रपद शु.११ शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी, सकाळी ११ वाजता आम्ही देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर "दार उघड उद्धवा दार उघड" अशी आर्त हाक देत "घंटानाद आंदोलन" करणार आहोत. महाराष्ट्राची भाविक जनता, विविध धार्मिक-आध्यात्मिक संस्था,संघटना, विविध देवस्थानांचे विश्वस्त, विविध संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की, या पवित्र घंटानाद आंदोलनात आपण सहभागी व्हावे."
आचार्य तुषार भोसले
संयोजक,
आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्र.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा